इथे काळ कधीच पुढे सरकत नाही . याउलट इथे काळ थांबतो आणि माणसं काळाच्या पुढे जातात . म्हणजे तिथे एका सिलिकाच्या गळ्याभोवती सगळे काळ फिरत असतात . असे ९९९९९९९९९ एवढे गोळे आत्तापर्यंत अस्तित्वात आहेत .इथे आपण आपल्याला हव्यात्या काळात जगू शकतो . पण या काळातून त्या काळात आपण संपर्क साधू शकत नाही . या जगाचा इतिहास इतिहास शोधून काढताना भरपूर शास्त्रज्ञांनी या कलेचा वापर केला आहे . पण जर इथल्या लोकांना प्रजनन करायचे असेल तर मात्र आपण जन्मतो त्याच काळात फक्त प्रजनन करता येतं . इथे दर १० वर्षांनी एक नवा कालखंड तयार होतो . एका गोळ्याभोवती २००० काळ फिरू शकतात . हे सगळे सिलिकाचे गोळे सूर्याच्या गाभ्यात ठासून भरलरेल असतात आणि प्रत्येक काळात ९९९९ सूर्य असतात . पण या काळातून त्या काळात जायचं असेल तर खूप ट्रेनिंगची गरज असते कारण इतके कालखंड असतात की कुठले कालखंड कुठले आहेत हे कळायला तर पाहिजे ना ! इथे कोणाचाच वाढदिवस साजरा केला जात नाही . खरं म्हणजे इथल्या लोकांना ' वाढदिवस म्हणजे काय ' हेच माहित नाहीये . इथे एक कालखंड ५ वर्षांचा असतो आणि एका युगात ९९९९९९९९९९ वर्ष असतात . पण इथे भविश्यात डोकावूनबघायचं असतं तेव्हा १० वर्षांच्या ऍडव्हान्स ट्रेनिंगची आवश्यकता असते नाहीतर आपण तो काळ येईपर्यंत तिथे अडकून पडण्याची दाट शक्यता असते .
ॠजूल तुझ्या डोकयालिटीला सलाम
उत्तर द्याहटवाBapree pachni padayla khup wel lagtoy mala
उत्तर द्याहटवाI counted those 'nines' againa and again, say nine times 😀😀
उत्तर द्याहटवाGood work, Rujul, keep it up!!
Khup adbhut jagachi nirmitee karat aahes..mastach ga..shubbheccha.
उत्तर द्याहटवा